रँडम जोक

| | Posted On 11/12/10 at 8:36 PM

एकदा मध्यरात्री एका घरात चोर शिरतो. नवरा-बायको झोपलेले असतात. नवर्‍याच्या घोरण्यामुळे बायकोची झोप चाळवते आणि तिला कपाट उघडायचा प्रयत्न करणारा चोर दिसतो.

ती आरडाओरडा करणार इतक्यात चोर तिच्या तोंडत बोळा कोंबतो, तिचे हात-पाय बांधतो आणि कामाला लागतो.

खुडबुड ऐकून नवर्‍याला जाग येते. तो डोळे किलकिले करून बघतो तर बायको तोंडात बोळा आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत आहे आणि चोर कपाटातलं सामान बॅगेत भरतोय.

ते बघून नवरा चोराला म्हणतो "बाबा रे, तुला काय हवं ते घेऊन जा. पण कॄपा करून हिच्या तोंडातला बोळा नको काढूस."


- आदि जोशी

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

| | Posted On 11/4/10 at 2:37 PM

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,


तुम्हा सर्वांना आणि तुमच्या आप्त-स्वकियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

ही दिवाळी आणि येणारे वर्ष तुम्हा सर्वांना सुख-समॄद्धीचे, भरभराटीचे, कमी खर्चाचे, पगार वाढण्याचे, मुलांच्या फिया न वाढण्याचे, सासरच्या कमी फेर्‍या होण्याचे, बायकोकडून कमी टोमणे खाण्याचे, लग्नाच्या जेवणाची वारंवार आमंत्रणं येण्याचे, कामवाल्या बाईच्या कमी सुट्ट्यांचे आणि तुम्हाला ऑफिसमधून सुट्ट्या मिळण्याचे, पेट्रोलचे भाव न वाढण्याचे, वेळेवर गॅस येण्याचे आणि पोटात गॅस न होण्याचे, ट्रेन मधे बसायला जागा मिळण्याचे, बायकोला तुमच्या थापा पटण्याचे / नवर्‍याने कमी थापा मारण्याचे, हवं तिथे, हवं तेव्हा टॅक्सी / रिक्षा सापडण्याचे, वेळी अवेळी कॉलसेंटरचे कॉल न येण्याचे, सेल मधे तुमच्या मापाचे कपडे सापडण्याचे आणि लगेच तुमचे माप न वाढण्याचे, तुमच्या सर्व इच्छा (सुप्त आणि प्रकट) पूर्ण होण्याचे आणि चुकून माकून ब्लॉग लेखक असाल तर ब्लॉग विझीट्स + फॉलोअर्स वाढण्याचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.



आपला,


आदि जोशी

सूड

| Labels: | Posted On 11/3/10 at 11:23 AM

जेव्हा आपले म्हणवणारेच आपला घात करतात, जिवाभावाचे मित्र पाठीत खंजीर खुपसतात आणि स्वतःची सावली उलटून वार करते, तेव्हा सुरू होते कथा एका सुडाची.


ह्या कथेचा नायक एक सरळमार्गी, मध्यमवर्गीय तरूण आहे. त्याचं आयुष्य मुंबईत गेलं. नोकरी निमित्त २ वर्ष घरापासून तो लांब राहिला. हा तरूण नुकताच लग्नाच्या गोड बंधनात अडकला आहे. आणि सगळ्या नवर्‍यांप्रमाणे न वागता त्याने स्वतःला गॄहस्थाश्रमात झोकून दिलं आहे. लग्नानंतर काही महिने नोकरीच्या गावी राहिल्यावर तो आपल्या घरी परत आला. आणि ह्या कथेला सुरूवात झाली. 

तो परत आल्यामुळे त्याच्या चांडाळचौकडीतले ३ जण - गिर्‍या, शिर्‍या आणि विर्‍या ह्यांना खूप आनंद झाला. त्याच्या पुनरागमनाप्रित्यर्थ त्यांनी जंगी पार्टीचं आयोजन केलं. आपले मित्र आपल्याला विसरलेले नाहीत हे बघून त्याला गहिवरून आलं. 

नायकाचा स्वभाव माहिती असल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा ताबा घेतला आणि कोपर्‍यात नेऊन आपले अनुभवाचे बोल पाजळायला सुरुवात केली. "नव्या नोकरीत पगार वाढल्याचं बायकोला सांगू नकोस, बायकोवर आधी पासूनच कंट्रोल ठेव, तिला डोक्यावर बसू नको देऊस, उठ-सूट तिच्यासोबत तिच्या माहेरी जाऊ नकोस, एकटीला जाऊ दे हवं तितके वेळा" ह्या मित्रांच्या सल्ल्यांनी आपला नायक फारच गडबडून गेला. "बायकोला अर्धांगिनी म्हणतात कारण लग्नानंतर आपला पैसा, स्वातंत्र्य आणि घरातलं महत्वं अर्ध होतं" ह्या गिर्‍याच्या व्याख्येमुळे तर त्याची पारच तंतरली. "अरे मित्रांनो, बायको म्हणजे माझी शत्रू आहे का?" असं नायकाने म्हणताच त्याचे मित्र फिदिफिदि हसले आणि "कळेल, कळेल" असं म्हणून निघून गेले.

नायकाचं लग्नाळलेलं आयुष्य हळू हळू सुरू झालं. नव्या नोकरीतही तो रुळला. काही महिने छान, मस्त, मजेत गेले. 

आणि एके दिवशी त्याला जाणवू लागलं की त्याचे मित्र त्याच्याची आता पूर्वीसारखे वागत नाहीत. त्याला बघून कुत्सितपणे हसतात. त्याची चेष्टा करतात. ह्याचं कारण काही त्याला कळेना. आता सांसारिक जबाबदार्‍यांमुळे त्याला पूर्वीसारखं मित्रांसोबत वेळ घालवता येत नसे हे त्यालाही मान्य होतं. गच्चीत रंगणार्‍या मैफिली, रात्र रात्र चालणारे कॅरम आणि पत्त्यांचे डाव, हॅलोजन लाऊन सोसायटीच्या मैदानात चालणार्‍या बॉक्स क्रिकेटच्या मॅचेस ह्यातून त्याने कधीच अंग काढून घेतलं होतं. सद्ध्या सोसायटीत त्याची हजेरी फक्त मिटींग्जना आणि पूजेला असे. बहुदा त्याचाच राग मित्रांना आला असेल असं आपल्या नायकाला वाटलं. तसं त्याने त्यांना विचारूनही बघितलं पण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं. त्याच्यावर जणू सार्वजनीक बहिष्कारच घालण्यात आला होता. खरं म्हणजे शिर्‍या आणि गिर्‍याचंही नुकतंच लग्न झालेलं असतानाही त्यांचं आयुष्य पूर्वीप्रमाणेच देवाच्या नावाने सोडलेल्या वळू सारखं मुक्तछंदी कसं राहिलं हे कोडं त्याला सुटेना. 

एकदा पिकनिकचा प्लॅन ठरत असताना तो मित्रांसोबतच होता. पण "ह्याला नका विचारू, ह्याला घरी कामं असतात विकेंडला... हॅ हॅ हॅ" असं म्हणून ह्याला खड्यासारखं वगळण्यात आलं. आपले जिवश्च-कंठश्च मित्र गिर्‍या, शिर्‍या आणि विर्‍या आपल्याशी असे का वागतात ह्या पेचात आपला नायक पडला. 

प्रश्न त्याच्या मनात रूंजी घालत होते. आपला बिचारा नायक आतल्या आत कुढत होता. भाजी निवडताना, कपडे वाळत घालताना, बाथरूम घासताना आणि भाजीवाल्या भैय्याशी घासाघीस करतानाही सतत त्याच्या मनात हाच विचार असे. त्याचं कामात लक्ष लागेना. पोळ्या करपू लागल्या, भात कच्चा राहू लागला, कपड्यांवरचे डाग तसेच राहू लागले.

हळू हळू त्याच्यावरिल बहिष्काराला वेगळाच रंग चढू लागला. गिर्‍या, शिर्‍या आणि विर्‍या आता जाता येता टोमणे मारू लागले. त्याला ओझ्याचा बैल म्हणून हिणवू लागले. (बैल त्याला बायकोही म्हणत असे. पण मित्रं ओझ्याचा बैल का म्हणत हे त्याला कळलं नाही.) चोहोबाजूनी त्याच्यावर आक्रमण होऊ लागलं. आणि एके दिवशी त्याच्या सहनशक्तिचा कडेलोट झाला. नेहमीप्रमाणे ऑफिसमधून येता येता स्टेशनवर उतरून त्याने भाजी घेतली. विंग मधे शिरताच त्याला समोर एक पोस्टर दिसलं. त्यावर दोन फोटो होते आणि मथळा होता "वाँटेड - जुना आदि जोशी" आणि पहिलं चित्र होतं - "बिफोर - हातात शॉपिंगच्या पिशव्या" आणि दुसरं चित्र होतं "आफ्टर - हातात दळणाची पिशवी". ह्यावर कडी म्हणजे त्या पोस्टरवर लाईन होती "कोण होतास तू, काय झालास तू, अरे अ‍ॅड्या कसा, नवरा झालास तू".

हे बघून त्याने ठरवलं बास झालं. ह्याचा बदला आपण घ्यायचाच. त्याच्या डोळ्यासमोर आता एकच शब्द फिरू लागला "सूड". त्याला सूड गंडाने पछाडून टाकलं. पण सूड घ्यायचा कसा हे मात्र त्याला कळेन. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला गिर्‍या, शिर्‍या आणि विर्‍या ह्यांचे हसरे चेहरे दिसू लागले. दिवसेंदिवस घुसमट असह्य होत होती. आणि एके दिवशी पालक निवडता निवडता अचानक त्याच्या डोक्यात बल्ब पेटला. चेहर्‍यावरच्या काळजीची जागा खुनशी हास्याने घेतली. त्याने लग्न न झालेल्या विर्‍याला सोडून गिर्‍या आणि शिर्‍याला टार्गेट करायचं ठरवलं. गिर्‍या आणि शिर्‍या अब तुम्हारी खैर नहीं असं म्हणून तो प्लॅन आखणीच्या कामाला लागला.

प्लॅन नुसार त्याने पहिला फोन केला शिर्‍याच्या बायकोला, स्वातीला. शिर्‍याचं त्याच्या महिनाभर आधीच लग्न झालं होतं. त्यामुळे त्यांची अ‍ॅनिवर्सरी जवळ आली आहे हे त्याला माहिती होतं. आता त्याचं लग्न ३० डिसेंबरला झाल्याने शिर्‍या बायकोसोबत कुठे फिरायला जाण्यापेक्षा मित्रांसोबत ३१ ला हुंदडायचे प्लॅन्स बनवणार हे ही त्याला माहिती होतं.

आदि - हॅलो स्वाती, कशी आहेस?
स्वाती - मी मजेत. तू कसा आहेस? आणि असतोस कुठे आजकाल?
आदि - आहे गं इथेच. तुझ्याकडे एक काम होतं. म्हणजे जरा मदत हवी होती तुझी.
स्वाती - सांग ना...
आदि - अगं तुला माहिती आहे ना आमच्या लग्नाची अ‍ॅनिवर्सरी जवळ आली आहे.
स्वाती - हो, आमची पण...
आदि - बरोबर. मला ना माझ्या बायकोला एक सरप्राईझ द्यायचं होतं. 
स्वाती - अरे व्वा... शॉपिंग करायचंय का तिच्यासाठी?
आदि - नाही गं, त्याहून भारी सरप्राईज...
स्वाती - काय रे?
आदि - मी तिला १ आठवडा सुट्टीवर घेऊन जायचा प्लॅन करतोय.
स्वाती - सुपर्ब... लकी आहे बाबा तुझी बायको.
आदि - पण त्यासाठी तुझी मदत हवी आहे. 
स्वाती - हां, सांग ना...
आदि - माझ्याकडे ३ ऑप्शन्स आहेत - अंदमान-निकोबार, काश्मिर किंवा श्रीलंका. ह्यातला कुठला निवडू?
स्वाती - अरे कुठलाही निवड, नवरा आठवडाभर फिरायला घेऊन जातोय हेच खूप असतं बायकांसाठी.
आदि - ते ठीक आहे पण जाऊ कुठे?
स्वाती - अंदमान-निकोबार बेस्ट आहे.
आदि - ओक्के डन मग... पण तिला सांगू नको बरं का...
स्वाती - यस बॉस...
आदि - बाय द वे, पुढल्या महिन्यात तुमचीही ऍनिवर्सरी आहे ना? तुम्ही कुठे जाताय फिरायला?
स्वाती - आम्ही? माहिती नाही. शिर्‍या म्हणाला त्याच्या ऑफिसमधल्या मित्रांनी काही तरी प्लॅन बनवलाय.
आदि - ह्म्म्म्म... असा कसा हा शिर्‍या? मी बोलतो त्याच्याशी.
स्वाती - नको. बोलून काही उपयोग नाहिये. तुम्ही एंजॉय करा, मी बोलते तुझ्याशी नंतर.


ह्या नंतर आपल्या नायकाच्या गडगडाटी असूरी हास्याने त्याची केबिन दुमदुमून गेली. प्लॅन नुसार पुढची चाल तो खेळला. पुढला फोन गिर्‍याच्या बायकोला, नेहाला.

आदि - नमस्कार वहिनी साहेब, कशा आहात?
नेहा - काय रे, आज अचानक कशी आठवण आली.
आदि - अगं जरा मदत हवी होती तुझी.
नेहा - बोल ना.
आदि - आज ना मी हिला रात्री जेवायला घेऊन जायचा प्लॅन करतोय.
नेहा - अरे व्वा? कुछ खास वजह?
आदि - खास असं नाही, पण आज आमच्या लग्नाला १० महिने झाले ना, त्याचं सेलिब्रेशन...
नेहा - काय सांगतोस काय? आणि हे तुझ्या लक्षात आहे?
आदि - म्हणजे काय? अगं अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच आयुष्यात खरी रंगत येते.
नेहा - खरंय रे तुझं.
आदि - तर तुझ्या ऑफिसच्या बाजूला जवळ ते फ्लेवर्स ऑफ इंडिया ओपन झालंय ना तिथे १ टेबल बुक करशील का आमच्यासाठी?
नेहा - वॉव, नक्की करीन. सहीच आहे ते हॉटेल. मी गिर्‍याच्या कधीपासून मागे लागलेय तिथे जाऊया म्हणून...
आदि - मग?
नेहा - मग काय? अजून ठरतोय आमचा प्लॅन.
आदि - ह्म्म्म्म असा कसा हा गिर्‍या? मी बोलतो त्याच्याशी.
नेहा - नको. बोलून काही उपयोग नाहिये. तुम्ही एंजॉय करा, मी बोलते तुझ्याशी नंतर.

ह्या नंतर आपल्या नायकाच्या गडगडाटी असूरी हास्याने त्याची केबिन पुन्हा एकदा दुमदुमून गेली.

तो आपली चाल खेळला होता. त्याने सोडलेले हे दोन बाँब लवकरच त्यांच्या टार्गेटवर आदळणार आणि धमाके होणार ह्याची त्याला खात्री होती. ते होण्याची तो वाट बघत होता.

आणि एके दिवशी त्यानी सोडलेला पहिला बाँब फुटला. गाजर हलवा बनवण्यासाठी गाजरं किसत असताना समोरच्या शिर्‍याच्या घरातून पहिल्यांदा जोरात पातेलं आदळल्याचा आणि नंतर कपबशी फुटल्याचा खळ्ळ्ळ्ळ आवाज झाला.

पुन्हा ते भेसूर हास्य त्याच्या चेहर्‍यावर उमटलं. त्याने तॄप्त मनाने एक खोल श्वास घेतला. 

आज त्याचा सूड पूर्ण झाला होता.

 

काही दिवसांनी...

आता गिर्‍या, शिर्‍या आणि आदि सोसायटीच्या बागेत बसून भाजी निवडता निवडता विर्‍याला टोमणे मारत असतात.

 

सूड कथा समाप्त




माझ्या काही जिवाभावाच्या मित्रांसाठी खास सूचना: ही कथा काल्पनिक असली तरी ती कधीही सत्यकथा होऊ शकते हे लक्षात असू द्या.  

 

निर्लज्ज व्हा - अंतिम भाग

| Labels: | Posted On 10/28/10 at 10:07 AM

मुली जेव्हा नुकतंच लग्न होऊन सासरी जातात तेव्हा पहिले काही दिवस त्यांची पार गंमत उडालेली असते. काही म्हणजे काही कळत नाही. नवं घर, नवी माणसं आणि लग्नापूर्वी आपला वाटणारा आणि लग्नानंतर अचानक सासरच्या गोटात सामील झालेला नवरा अशा वेगवेगळ्या लेव्हल्सवर तिचा सामना सुरू असतो. गाडं पहिल्यांदा अडतं ते स्वयंपाक करण्यावरून. लग्नाआधी आईने महिन्यांचा क्रॅशकोर्स करून घेतलेला असतो. पण लग्नापूर्वीच्या महिन्याभरात लग्नाच्या तयारीमुळे सगळ्यावर छान बोळा फिरवला जातो. त्यात आजकालच्या मुलींना मी नोकरी करत असूनही घर उत्तम सांभाळते हे दाखवून द्यायची भारीच हौस असते. आणि इथेच लोचा होतो. भरीसभर म्हणून काही नवरे पावलो पावली बायकोची तुलना त्यांच्या आईशी करतात. सगळ्याच बाबतीत. तर अशी एक घटना आपण बघू.

घटना - सामान्य दॄष्टीकोन
वेळ - मंमं करायची
पार्श्वभूमी - तुम्ही मर मर मरून कमी करपलेल्या पोळ्या आणि करायला सोप्पी म्हणून बटाट्याची भाजी केली आहे. नवरा पहिला घास तोंडात टाकतो.


नवरा - अगं ही कसली भाजी केली आहेस? मी ऑफिसमधून उशिरा आल्याची इतकी भयानक शिक्षा?
बायको - का रे? काय झालं? बटाट्याची आहे ही.
नवरा - ते कळलं गं, पण ही अशी? अशी बटाट्याची भाजी मी मागच्या ३० वर्षात खाल्ली नव्हती.
बायको - मीठ जास्त पडलं का?
नवरा - नाही... मीठ बरोबर आहे, भाजीत बटाटे कमी पडलेत.
बायको - अरे काय झालं नीट सांगशील का?
नवरा - खाऊन बघितलीस तू मला वाढण्याआधी?
बायको - हो...
नवरा - मग कळलं नाही तुला? साधी बटाट्याची भाजी करता येऊ नये म्हणजे कमाल आहे.
बायको - अरे पण...
नवरा - आणि मला खाकरे आवडतात हे बरोबर आहे, पण ते चहाशी. जेवायला नव्हे.
बायको - असं रे काय करतोस? मी पण नुकतीच सुरुवात केली आहे ना?
नवरा - पण साध्या पोळ्या येऊ नयेत म्हणजे कमाल झाली. एकदा माझ्या आईच्या हातचं खाऊन बघ म्हणजे कळेल फरक खाकरे आणि पोळ्यांमधला
(
बायको मुसमुसायला लागते)
नवरा - आता रडू नकोस. एव्हढं काही झालं नाहिये...
बायको - मग तू किती ओरडतोस माझ्यावर...
नवरा - ओरडू नाही तर काय करू...
(
नवर्याचं आई पुराण पुन्हा सुरू होतं.)

आता ह्या समर प्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी उत्तम स्वयंपाक शिकणे अथवा स्वयंपाकाला बाई ठेवणे हे दोनच उपाय आहेत. पण तोपर्यंत किल्ला लढवण्यासाठी निर्लज्जपणाच तुमच्या मदतीला धाऊन येईल


----------------------------------------------------------------------------------------


घटना - निर्लज्ज दॄष्टीकोन
वेळ - मंमं करायची
पार्श्वभूमी - तुम्ही मर मर मरून कमी करपलेल्या पोळ्या आणि करायला सोप्पी म्हणून बटाट्याची भाजी केली आहे. नवरा पहिला घास तोंडात टाकतो.


नवरा - अगं ही कसली भाजी केली आहेस? मी ऑफिसमधून उशिरा आल्याची इतकी भयानक शिक्षा?
बायको - का उगाच आरडा-ओरडा करतोयस?
नवरा - अगं भाजीत मीठ किती जास्त आहे? वाढण्याआधी चव घेऊन नाही बघितलीस का?
बायको - बघितली, मीठ जास्त वाटलं म्हणून पुन्हा थोडे बटाटे घातले तर भाजी अळणी झाली. म्हणून चवीपुरतं मीठ टाकलं तर तू म्हणतोस भाजी खारट झालेय.
नवरा - खरंच झालेय अगं. साधी भाजी करता येऊ नये तुला म्हणजे कमाल आहे.
बायको - कमाल काय त्यात? मी काय खाणावळ चालवते?
नवरा - तसं नव्हे. पण... जाऊ दे... तू एकदा आईच्या हातचं जेऊनच बघ म्हणजे तुला कळेल.
बायको - आई सारखी भाजी हवी होती तर लग्न कशाला केलंस, दत्तक जायचंस कुणाला तरी. आणि २०-२५ वर्षांनी मी सुद्धा टकाटक स्वयंपाक करेन.
नवरा - म्हणजे तोवर मी असंच जेवायचं?
बायको - नाही रे...
नवरा - मग?
बायको - एक आईडिया आहे... आपण सासूबाईंना बोलावून घेऊ... त्यांच्या हाताला खरंच चव आहे...
नवरा - ते आहेच गं. पण...
बायको - आणि तशीही त्यांना आवड आहेच तुला रोज वेगवेगळं काही तरी करून खायला घालायची.

नवरा - हे कुणी सांगितलं तुला?
बायको - अरे परवा तुला तिसर्‍यांदा डब्यात बटाट्याची भाजी दिली तेव्हा तूच नाही का म्हणालास?
नवरा - अगं ते वेगळंबायको - काही वेगळं नाही... ठरलं तर, आपण आता जरा मोठं घर घेऊ आणि सगळे एकत्रच रहायला लागू, प्रश्नच मिटला...
नवरा - (प्रकट) नको... इतकं काही वाईट झालं नाहिये. (स्वगत - अजून मोठं घर म्हणजे अजून मोठा हफ्ता, म्हणजे खर्चावर अजून लगाम. काय च्यायला वैताग आहे.)
बायको - नाही तर अजून 
एक आईडिया... आपण बाई ठेऊ स्वयंपाकाला... माझ्या ओळखीत आहेत एक मावशी... दोन्ही वेळच्या जेवणाचे फक्त ,००० घेतात
नवरा - (प्रकट) इतकी काही गरज नाहिये गं, जमेल तुलाही हळू हळू... (बापरे, फक्त स्वयंपाक करायचे ,०००त्यापेक्षा मी शिकतो, मला दे ते ,०००)
बायको - पण त्याला वेळ लागेल रे...
नवरा - वेळ सगळ्यालाच लागतो अगं. जाऊ दे, ये जेवायला...


घटना समाप्त

अशा साध्या साध्या घटनांतून आपल्याला निर्लज्जपणाचं महत्त्व संसारात पावलोपावली पटू लागेल.


---------------------------------------------------------------------------------------------------------------------


निर्लज्जपणा जर सगळ्यात जास्त कुठे उपयोगी पडत असले तर तो संसारात. A perfect marriage is based on perfect mutual misunderstanding असं कुणी एक थोर तत्त्ववेत्ता सांगून गेला ते खरंच आहे. पण ह्या पलिकडे जाऊन आपल्या नवर्याच्या मर्कटलिलांकडे दुर्लक्ष करण्यासाठी निर्लज्जपणाच उपयोगी पडतो. "किती वेळा सांगितलं तरी हा काही सुधारत नाही" ही जगातल्या समस्त बायकांची तक्रार आहे. आणि त्यावर कुणालाही अजूनही सोल्यूशन शोधणं शक्य झालेलं नाही. त्यामुळे त्या फंदात पडूच नये.


नवर्यांचं सुधारणं हे सिनेमात नितंब उडवत नाचणार्या (शब्दप्रयोग कणेकरांकडून साभार) बार बाला कम आयटम गर्लला एके दिवशी होणार्या "अरे, आपण अभिनयाशी संबंधीत क्षेत्रात काम करतो" ह्या साक्षात्कारासारखं असतं. ते फारसं मनावर घेऊ नये. एखाद्या सिनेमात - मिनिटं मेक-अप शिवाय दर्शन देऊन आणि अंगभर खादीची साडी गुंडाळून गंभीर आवाजात संवाद म्हटल्यावर त्या जशा पुन्हा नितंब उडवायला मोकळ्या होतात तसंच नवर्यांचंही आहे. अचानक एके दिवशी ह्यांना 'अरे, संसाराचा गाडा दोन चाकांवर चालतो आणि आपल्या चाकाची गती दुसर्या चाकाच्या मानाने जरा कमी आहे" हा साक्षात्कार होतो. आणि त्यावर उपायही सुरू होतो. पण तो रुमाल जागेवर ठेवणे, सोसायटीच्या वॉचमनला दळण आणायला पाठवणे इत्यादि पुरता मर्यादित असतो. ह्या दोघांमधलं अजून एक साम्य म्हणजे ह्या बार बाला / आयटम गर्ल जशा त्या मिनिटांच्या भुमीकेची आठवण पुढल्या प्रत्येक मुलाखतीत काढतात तसेच नवरेही एखाद्यावेळी जागेवर ठेवलेला रुमाल, ऑफिस बॉयला पाठवून भरलेलं बिल, इत्यादी कामांची आठवण प्रत्येक भांडणात काढतात. त्यामुळे नवर्यांच्या सुधारित आवॄतीला फारसं मनावर घेऊ नये. नवरा आणि तेरड्यातलं साम्य ओळखावं.


मुळात लग्न झालं तरी नवर्यांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. घर तेच, मित्र तेच, कट्टा तोच. "त्यामुळे लग्नानंतर तू बदललास" म्हणजे नक्की काय झालं हेच नवर्यांना कळत नाही. उलट "मी होतो तसाच आहे, मग आता कसला त्रास होतोय" हे त्यांना कळत नाहीह्यावर उपाय म्हणून नवरे-स्पेसिफिक निर्लज्जपण अंगी बाणवायला हवा. हा नवरे-स्पेसिफिक निर्लज्जपण अंगी बाणवून संसार सुखाचा कसा करावा हे कळण्यासाठी नवर्यांचे काही गुण आणि खास सल्ले इथे देत आहे.


संसार सुखाचा करण्यासाठी बायकांना काही सल्ले:
.  "कल्पवॄक्ष कन्येसाठीह्या पि. सावळाराम ह्यांच्या गाण्यातला कल्पवॄक्ष म्हणजे नवरा नव्हे हे कॄपया ध्यान्यात घ्यावे.
. नवर्यांना कामाचा कंटाळा येतो. कुठल्याही.
. रविवार सकाळी उशिरा उठणे आणि दुपारी लोळत पडणे हे नवर्यांच्या सुखाच्या परमावधीचे क्षण असतात. त्यात बाधा आणू नये.
. साड्यांच्या दुकानात अख्खं दुकान खाली काढायला लाऊन "नाही आवडलं काही" ह्या शब्दात दुकानदारांची बोळवण करून बाहेर पडण्याची नवर्यांना मनापासून लाज वाटते. त्यामुळे नवर्यांना किमान साड्यांच्या खरेदीला नेऊ नये.
. नवर्यांचा खर्चाला आक्षेप नसतो, तो खर्च होण्यासाठी रविवार संध्याकाळ खर्ची घालण्याला असतो हे कॄपया समजून घ्यावे
. ब्रँडेड दुकानांत बार्गेन करता येत नाही ह्याचा नवर्यांना अजिबात त्रास होत नाही.
. नवर्यांना सासरी जाणं हे एक मोठ्ठ संकट वाटतं.
. आई पेक्षा चांगला स्वयंपाक जगात कुणालाही येत नाही. आईचा ३०-३५ वर्षांचा अनुभव आणि बायकोचे नवर्यावर चालणारे प्रयोग ह्यांची तुलना होऊ शकतच नाही.
. आईशी तुलना करायची असेल तर आधी किमान आईने जसं लाडाऊन ठेवलंय ते कंटिन्यू करण्यापासून सुरुवात करावी.
१०. लग्न झालं तरी नवरे सुंदर मुलींकडे बघायचं सोडत नाहीत. मी मुलांकडे बघितलं तर चालेल का हा प्रश्न गैरलागू आहे. 



ह्या काही गोष्टी बायकांनी लक्षात ठेवल्या तर जगातले यच्चयावत नवरे आणि पर्यायाने जगातले यच्चयावत संसार सुखाचे होतील


आणि संसार सुखाचा करण्यासाठी आता नवर्यांना एकमेव सल्ला:
"
आपल्या देवाने दोन कान दिलेत हे कधिही विसरू नका."